केळुस या वेंगुर्ल्यातील गावी जन्मलेले कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठीतील आद्य शिवचरित्रकार आहेत. त्यांनी बुद्धचरित्रही लिहिले आहे. ते मराठीतील चरित्रलेखक, भाषांतरकार, वक्ते, विचारवंत, सुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते व ब्राह्मणेतर चळवळीचे आधारस्तंभ होते.